मुंबई, 23 एप्रिल: नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे देशावरचे संकट असून कोणत्याही परिस्थितीत हे दोघे देशाच्या राजकीय क्षितीजावर दिसता कामा नयेत. यासाठी शिवसेनेला देखील मतदान करू नका कारण सेनेला मतदान म्हणजे या दोघांना मत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आवाहन केले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये सभा घेतल्यानंतर राज यांची मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईच्या काळाचौकी भागातील शहीद भगतसिंग मैदानात झाली.

या सभेत राज यांनी प्रथम मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शहीद जवानांच्या नावाने मत मागणारे आमचे PM हे फकीर नसून बेफिकिर असल्याची बोचरी टीका राज यांनी केली. मुंबईतल्या पहिल्याच सभेत राज यांनी शिवसेनेला देखील मतदान करू नका असे आवाहन केले. कारण सेनेला मतदान म्हणजे मोदी-शहा यांना मत असे राज यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours