ठाणे 30 ऑगस्ट : तरुणाईचा सळसळता उत्साह, नेटकं नियोजन, देखणं संयोजन, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात साजरा झाला ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजचा 'क्रिसलीस' महोत्सव. 'क्रिसलीस' म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरात रुपांतर होणं. म्हणजेच जमीनीवर पाय रोवून आकाशाला गवसणी घालणं. तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या 'क्रिसलीस'ची या वर्षीची थीम होती 'श्वाश्वत विकास' (Sustainable Development) तापमानात होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर 'श्वाश्वत विकास' ही काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाचं महत्त्व रुजवून शाश्वत विकासाचं बीजारोपण करण्यासाठीच ही संकल्पना ठेवल्याचं प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केलं.
चार दिवस विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव चांगलाच गाजला. 19, 21, 22 आणि 23 ऑगस्ट असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांनी 'क्रिसलीस'चा उत्साह वाढत गेला. 19 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी सामुदायिक स्वच्छता, वृक्षारोपण आणि येऊरच्या अनाथालयात मुलांना खाऊ देत, त्यांना विविध कला शिकवत त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours