मुंबई, 30 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि वाहनचालकाची जमावाने ठेचून हत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच उत्तरप्रदेशमध्ये 2 साधूंची मंदिरात हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आजच्या 'सामना'मध्येही या प्रकरणावरुन 'महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही' असं म्हणत योगी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

'राजकीय मनाचा गुंता! नवा साधू वाद!' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या लेखात राज्यातील भाजपचे नेते आणि योगी आदित्यनाथ सरकारवर सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.

'पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गंमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे' असा टोला योगी आदित्यनाथ यांना लगावण्यात आला आहे.

काय लिहिलंय आजच्या 'सामना'त?

'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात ही हत्या झाली ते संपूर्ण गाव भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अधिपत्याखाली बऱ्याच वर्षांपासून आहे. या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours