मुंबई, ता. 28 मे : आपल्या विधानासाठी नेहमी टीकेचे धनी ठरलेले भाजपचे राजस्थानमधील अलवर येथील आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी पुन्हा एक अजब वक्तव्य केलं आहे. रामभक्त हनुमान हे जगातील पहिले आदिवासी होते असा दावा त्यांनी केला आहे.
हनुमान हे आदिवासींसाठी पूरनीय आहे. कारण आदिवासींना एकत्रिक आणून त्यानं सेना तयार केली होती. आणि त्या सेनेला भगवान रामचंद्रांनी प्रशिक्षित केलं होतं, असं वक्तव्य ज्ञानदेव आहुजा यांनी केलं आहे.
दलित संघटनांनी २ एप्रिलला भारत बंद केले होतं. या आंदोलनादरम्यान हनुमानाच्या प्रतिमेचा अवमान झाला होता. तो व्हिडिओ पाहून खूपच दुःखी झालो असंही ते म्हणाले.
हनुमानाला आदिवासी बांधव देव मानतात. पण दलित संघटनांनी हनुमानाच्या प्रतिमेचा अपमान का केला हेच समजलं नाही. ही बाब खूपच दुर्दैवी आहे, असेही आहुजा म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours