सोलापूर, 28 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी पेटलेलं आग अजूनही काही विझलेली दिसत नाही आहे. कारण सोलापूरच्या माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्ग हा आज सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी रोखून घरला आहे. माठा तालुक्यातील दारफळ गावच्या तरुणांनी पहाटे 5 पासुन चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली. जाळपोळ करत आंदोलकांनी रस्तारोको केला आहे. रस्त्यावर टायर टाळून आणि झाडांच्या फांदा टाकत त्यांनी आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या तीव्र आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours