मुंबई, 1 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. 'सामना'च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘सामना थोडीच सरकार चालवतं, सरकार तर मी चालवतो,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या खोचक टीकेनंतर आता शिवसेनेनेदेखील सामनातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख?
चौथ्या वर्षी त्यांनी सांगितले की, ''सरकार 'सामना' चालवत नाही, मी चालवतो'' वगैरे. मुख्यमंत्री,
'सामना'च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून 'सामना' वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. 'सामना' हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारड्यांचा आरसा आहे. मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. श्रीमान फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! अब आया उंट पहाड के निचे, असे आम्ही मानावे काय?

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours