मुंबई, 9 मे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. याचा अर्थ त्यांना पक्षानं डावललं आहे. यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी भावनिक ट्वीट केलं आहे. 'पण, वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही', असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

बंडखोरांना चाप...
2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीत सिंह मोहिते यांच्यासह डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या बंडखोरांना चाप लावल्याचं स्पष्ट झालं आहे.
देवेंद्र फडणवीसांचं वर्चस्व
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती. त्यामुळे साहजिकच निवडणुकीतील प्रत्येक मोठ्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचवेळी दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा खडसे, तावडे, मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवल्याने पक्षात अजूनही फडणवीसांचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे, विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यानं एकनाथ खडसे देखील नाराज झाले आहेत. ज्यांनी पक्षाला, नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना उमेदवारी? ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांना उमेदवारी? एवढं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला पक्षानं उमेदवारी दिली आहे. असे प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केले आहेत. भाजप कोणत्या दिशेनं चालला आहे, हे चिंतन करण्याची गरज असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
40-42 वर्षांपासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यामुळे विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. एवढंच नाही तर माझ्यासह पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात होती. मात्र, शुक्रवारी पक्षाने जाहीर केलेल्यात निष्ठावंतानाच डावलल्याचं आश्चर्य वाटल्याचं एकनाथ खडसे यांना सांगितलं.
'गो बॅक मोदी' असा नारा देणाऱ्याला उमेदवारी..
एकनाथ खडसे म्हणाले,धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकला होता. 'गो बॅक मोदी' अशा घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण निष्ठावंताना डावललं जातं. त्यामुळे पक्ष कोणत्या दिशेनं चालला आहे, हे चिंतन करण्याची गरज आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours