गडचिरोली: गडचिरोली-चंद्रपूर सारख्या दुर्गम आदिवासी भागासापून या आरोग्य सेवा अजूनही कोसोदूर आहेत. व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचे तिथं कसे बळी जातात त्याची ही करूण कहाणी...
चंद्रपूर गडचिरोलीतल्या गेल्या चार दिवसांमधल्या तीन घटनांनी दुर्गम भागातल्या आरोग्यव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. यातल्या तीन महिलांच्या नशिबी जे आलं ते ऐकून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अहेरी तालुक्यातील ताटीगुडमटोलाच्या विनोदा पेंदामची रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून घरातच प्रसुती झाली. त्यानंतर नवजात बाळाची प्रकृती बिघडली.
पण त्यावेळीही रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यानं अवघ्या काही तासांतच त्या बाळानं जगाचा निरोप घेतला. या घटनेच्या चौथ्या दिवशी पंधरा दिवसांच्या बाळंतीणीवरही अशीच वेळ ओढवली. रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं खासगी वाहनातून गडचिरोलीला नेईपर्यंत तिचा मृत्यू ओढवला. कमलापूर या एकाच आरोग्यकेंद्रातल्या या दोन धक्कादायक घटना.
तिसरी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाटणच्या आरोग्य केंद्रातली आहे. इथं रुग्णवाहिकेला चालकच नव्हता. त्यामुळे कमल राठोड या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिच्या भावानं चक्क सायकलवरून पाटणला नेलं. पण तिथं गेल्यावर डॉक्टर आणि नर्स नसल्याचं समजलं. अखेर सोबत आलेल्या आईनंच तिची प्रसुती केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours