प्रतिनिधी /गडचिरोली
                   राज्यातच नव्हे तर देशातच वैदयकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया नीट नुसार सुरू झाली आहे ओबीसींना राज्याप्रमाणे  देशपातळीवर २७ टक्के आरक्षण देणें बंधनकारक आहे. परंतु केंद्रातील २७ टक्के जगाच्या प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय वैदयकीय प्रवेश समितीने मागच्या वर्षी ओबीसींच्या २६ टक्के छेद देत केवळ २ टक्के अर्थात ६८ जागा दिल्या होत्या उर्वरित ओबीसींच्या  हक्काच्या २५ टक्के जागा खुल्या वर्गाकडे  वळत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती
                     केंद्रीय निवड समितीने  ओबीसी समाजावर अन्याय केला असून ओबीसींमध्ये प्रचंड असंतोष भडकला होता.परंतु शासनाने या कडे दुर्लक्ष करून यावर्षीही ओबीसीना डचू दिले असून ६८ जागे पैकी ६ जागा यावर्षी वाढवून अवघे ७४ जागे वर समाधान मानावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यानी सांगितलं आहे अभ्यासक्रमाचा ६६ हजार ८३५ जागा आहे राज्यात आरक्षण धोरणानुसार अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १५ व ७.५ टक्के तसेच  ओबीसीं साठी २७ टक्के जागा  निश्चित करण्यात आला , याच धर्तीवर देशपातळीवर १५ टक्के अर्थात ९ हजार ५७५  जागांचे प्रवेश निश्चित करताना अनुसूचित जाती , जमाती आणि ओबीसी विद्यार्थाना राज्यात आरक्षणाचा निकष लावणे बंधनकारक होते. देशपातळीवर प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती , जमातीच्या आरक्षित जागा निश्चित केल्या परंतु ओबीसींना व २६ टक्के आरक्षणानुसार ५८५ जागांवर प्रवेश न देता २ टक्के प्रमाणे म्हणजेच ६८ जागांवर प्रवेश देण्याचे धोरण तयार केले . देशपातळीवर १५ टक्के मेडिकल प्रवेशासाठी २३ टक्के जागा एससी , एसटी आणि ओबीसीना दिल्या आणि उर्वरित ६६ टक्के जागांवर जागांवर  खुल्या प्रवर्गासाठी ठेवल्या १५ टक्के प्रवेश्यामध्ये अनुसूचित जातीला ५५५ जागा तर अनुसूचित जामातीला २६६ जागा आरक्षणातून मिळाल्यानंतर २५८५ जागा ओबीसींना मिळणे आवश्यक असताना यावर्षी फक्त ६ जागा वाढवून ७४ जागावरच समाधान मानावे लागले   त्याच
                  केंद्रीय वैद्यकीय प्रवेशात केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्रालय वैद्यकीय शिक्षण परिषदेणे ओबीसीवर अन्याय केल्यामुडे  राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ कोर्टात जाणार असल्याची महिती असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुचित वांढरे यांनी सांगीतिल आहे  व  या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका (PIL ) टाकण्याकरिता जिल्ह्यातील पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेसह खालील पदाधिकाऱ्यांशी दि.११ -०७-१८ पर्यंत सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत संपर्क साधुन आपली तक्रार आणि झेरॉक्स प्रत सादर करावी रुचित वांढरे 8408040344,  राहुल भांडेकर 9767991001  , किरण कटरे 09579114910 , सुरज डोईजड 09405193956
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours