मुंबई, 26 नोव्हेंबर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(सोमवारी)दहा वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे.
'मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना श्रद्धांजली. ज्यांनी या हल्ल्यात आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना मोठ्या हिमतीने प्रत्युत्तर देणाऱ्या शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्राचा सलाम,' असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे
मुंबईच्या गुन्हेगारांना पकडणाऱ्याला 35 कोटीचं बक्षीस, अमेरिकेची मोठी घोषणा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(सोमवारी)10 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं एक मोठी घोषणा केली आहे. या हल्ल्याचे मास्टरमाईंड असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला 35 कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ला केला. यामध्ये 166 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.
'26/11 च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी यांना पकडण्यास मदत करणाऱ्याला 35 कोटींचं बक्षिस देण्यात येईल ,' अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours