चिपळूण, 03 जुलै: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण (Tiware dam) काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काढावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर संकट कोसळले आहे. गावातील 25 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले असून परिसरातील अन्य गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours