मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांत रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरं, रायगड, कोकण किनारपट्टी, पुणे सातारा भागांमध्ये हवामान विभागाने गुरुवारी रेड अलर्ट असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र पावसानं उसंत घेतली. आज पुन्हा पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासन आणि हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा देणात आला आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours