मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरं, रायगड, कोकण किनारपट्टी, पुणे सातारा भागांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे , ठाण्यासह कोकणातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अशिष शेलारांनी ट्टविट करून ही माहिती दिली आहे. बुधवारी दुपारनंतर मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस झाला होता. तर रायगड पालघर परिसरातील अनेक सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचालं होतं.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours