भाजपने खुपसले सेनेच्या पाठीत खंजर, मात्र वाघ शांत का? शिवसैनिकांचा सवाल
रिपोर्टर- अजय मेश्राम
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप प्रत्यारोप करीत आपल्या खासदारकीचा राजीनामा देणारे भूमिपूत्र नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक आता अटीतटीची ठरली आहे. भाजपने साम, दाम, दंडाचा वापर करीत सत्तेत असलेल्या आपल्याच मित्र पक्ष शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना पळविण्याचे राजकारण सुरू केल्याने सध्यातरी दोन्ही जिल्ह्यात शिवसेनाला खिंडार पडली असताना देखील शिवसेनेचा घायाळ वाघ शांत का ? असा खोचक सवाल शिवसैनिकांकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील राजकारणात राज्याचा व देश्याच्याही राजकारणाचा शिरकाव होताना पाहाला मिळून येत आहे. मुख्यमंत्र्यांसह देशाचे मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याही सभा चालू आहेत. परंतु या सभांमधून त्यांच्याच तिकीटावर निवडून आलेले नाना पटोले सरकारच्या शेतकरी व ओबीसी मंत्रालयाच्या प्रश्नावर मौनव्रत धारण केले होते. तेव्हा मात्र भाजपचे हे नेते काहीच बोलत नसल्याची टीका नाना पटोले यांनी व्यक्त केली होती. शेवटी या दोन्ही जिल्ह्यात भाजपची सत्ता असताना देखील विकास झाला नाही हे स्वत:च्या मुखातूनच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत बोलण्याचे नवे दालन उघडे करून दिले. पराभवाच्या भितीने भाजपचे नेते नको ते भाष्य करून जात असल्याचे दिसून येत आहे. आजच्या घडीला अर्थकारण व इतर मार्गाचा वापर करून सत्तेतील पक्ष कुरघोडीचे राजकारण करीत असल्याची टीका काँग्रेसकडून केली जात आहे. तर सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावणाNया शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
लोकसभा पोट निवडणुकीत विविध संघटनांनी आता आपले समर्थन जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लावली आहे. त्यात या पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवित असलेले किशोर पंचभाई यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेत थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदी असलेले इंजि. राजेंद्र पटले व गोंदिया जिल्हा प्रमुख कुथे यांनीही भाजपात प्रवेश घेतल्यामुळे शिवसेना नेमकी कोणती भूमिका या निवडणुकीत बजावणार आहे. याचे कोडे शिवसैनिकांना विचलीत करीत आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढविणारे किशोर पंचभाईंनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जनतेच्या मनात आपले स्थान कायम केले आहे. सहाजिकच निवडणुक लढविताना मोठ्या पक्षाचे पाठबळ मिळण्याच्या अपेक्षेने किशोर पंचभाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला असावा. भाजपसोबत सत्तेत असूनही तटस्थ भूमिका बजावणार या सेनेने आपले समर्थ जाहीर न केल्यामुळे किशोर पंचभाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे इंजि. राजेंद्र पटले यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन आपल्याच पायावर कुह्राडी मारल्याची चर्चा जिल्ह्यात चर्चिली जात आहे. किसान गर्जना संघटनेच्या माध्यमातून बळीराजाच्या मनात बसलेले इंजि. पटले यांनी भाजपमध्ये प्रवेश घेताच शेतकNयांच्या सर्व आशांवर पाणी फेरल्याचे बोलले जात असले तरी जातीय समिकरण जोडण्यासाठी भाजपने धनसत्तेचा आश्रय घेत मित्र पक्षाच्याच जिल्हाध्यक्षांची पळवापळवी करून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची चर्चा या निवडणुकीच्या गरमागर्मीत चर्चिली जात आहे. या अनाकलनिय प्रयत्नात भाजपकडून सेनेचा जनधाराचा उपयोग आपल्याकडे वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours