मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर पसरलेलं आंदोलनाचं लोण लवकरात लवकर शमवण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मतं जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीला साहित्य, कला, उद्योग, कृषी, यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. मंत्र्यांपैकी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देण्याचा पुनरूच्चार करीत, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत अडीच तास चाललेल्या या बैठकीत, न्यायालयीन लढाईपासून ते नोकरी शोधण्याच्या मुद्यांपर्यंत उहापोह करण्यात आला.
 सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या बैठकीत मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देण्याचा पुनरूच्चार करीत मुख्यमंत्र्यांनी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत? देशविदेशात खासगी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कसं सामावून घेता येईल? केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ मराठा तरुणांना कसा देता येईल? या विषयांवर अडीच तास चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ शिंदे, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, शेतीपुरक उद्योजक डॉ. सतीश परब, आ.ह.साळुंखे, राम ताकवले, हणमंत गायकवाड, सादनंद मोरे, पांडुरंग बलकवडे, सुरेश हावरे, प्रकाश पोहरे, अभिजीत पवार, बी.बी.ठोंबरे, पोपटराव पवार, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष तावडे, संभाजी निलंगेकर पाटील, सयाजी शिंदे, उल्हास घोसाळकर, जिजाब पवार, रघुजीराजे आंग्रे, एड. हर्षद निंबाळकर, एड शैलेष म्हस्के, तानाजीराव शिंदे, उपस्थिती होते.
दरम्यान, भाजपनेही मराठा आरक्षणासंबंधी चर्चा करण्यासाठी आज दुपारी मुंबईत आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या दोन्ही बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप समोर आले नसले तरी, या बैठकीमुळे मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे परळीमध्ये सकल मराठा मोर्चाची महत्त्वाची बैठक पार पडली. 7 ऑगस्टपर्यंत सरकरानं मराठा मोर्चाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा बैठकीनंतर देण्यात आलाय. तसंच या पुढे रस्त्यावर उतरून आंदोलन न करता ठिय्या आंदोलन करण्याचा  निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours