महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव’. या उत्सवानं महाराष्ट्राची आणि देशाचीही सीमा केव्हाच ओलांडली. आता जगभर पसरलेले भारतीय लोक गणेशोत्सव दणक्यात साजरा करतात. पुण्याने देशाला अनेक गोष्टी दिल्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या विचारविश्वाला दिशा दिली. प्रबोधनाची संपन्न परंपरा दिली. या परंपरेतलं अग्रणी नाव म्हणजे लोकमान्य टिळक. असंतोषाचे जनक. दुभंगलेला,विखुरलेला, समाज एकत्र आणण्यासाठी टिळकांनी गणशोत्सवाचा साधन म्हणून वापर केला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळं आणि प्रयत्नांमुळं गणेशोत्सवाला आजचं भव्य रूप प्राप्त झालं. गेल्या 125 वर्षांपासून केसरीवाडा गणेशोत्सवाने हीच प्रबोधनाची संपन्न परंपरा जपली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours