मुंबई: मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास असल्याने त्यांना महाराष्ट्रात महाआघाडीत सामील करू घेतलं जाणार नाही असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केलंय. मनसेचा कायद्यावर, घटनेवर विश्वास नाही. देशाच्या विविधतेवर त्यांचा विश्वास नाही त्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याला आमचा सक्त विरोध असल्याचंही निरूपम यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला सामील करून घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर कुणाशी आघाडी करायची याचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असं मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours