जालना: पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्याचबरोबर युती होऊन पुन्हा मीच जालन्याचा खासदार होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी बोलून दाखवला आहे.
ते जालन्यात आयोजित एका दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्याचबरोबर मी सगळ्या मतदार संघात फिरत असून प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याची इच्छा ही युती व्हावी अशी असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे यावर आता शिवसेनाकाय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
त्यात जालना लोकसभा मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे यासगळ्यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
तर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट लक्ष्य केलं होतं. युती तुटताना जी घोषणा केली होती, त्याच घोषणेवर आम्ही आम्ही कायम आहोत. ती घोषणा काय होती हे शिवसैनिकांना समजलं असं सांगत त्यांनी भाजपशी जुळवून घेणार नाही हे स्पष्ट केलं होतं
Post A Comment:
0 comments so far,add yours