मुंबई: धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे विधानभवनात दाखल झाले आहे. अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर राजीनाम्याचा निर्णय संध्याकाळी घेणार असल्याचं सांगितलं.

आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अनिल गोटे यांनी केली होती.

आज विधानभवनात दाखल होण्याआधी अनिल गोटे यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत साडे तीन तास चर्चा झाली. या चर्चेत गोटे यांचे मन वळवण्याचा प्रयत्त केल्याची माहिती मिळतेय. 

यावेळी अनिल गोटे यांनी पक्षात गुन्हेगारांना प्रवेश देणार नाही आणि दुसरं म्हणजे माझ्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाव्यात अशी मागणी केली आहे. जर माझ्या मागण्या नाही झाल्या तर राजीनामा देणार अशी इशारा गोटे यांनी दिला आहे.

११ नोव्हेंबर रोजी धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार अनिल गोटे यांना या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते, यावेळी आमदार गोटे हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भाषणासाठी उभे राहिल्यावर सभेच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले. महाजन यांचे भाषण संपल्यावर आयोजकांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सभा संबोधित करण्यासाठी बोलावले, यावेळी आमदार गोटे मध्येच उभे राहून आधी बोलण्याचा प्रत्यन करू लागले असताना दानवे यांनी त्यांना सभेत बोलण्यापासून रोखले. यावेळी अनिल गोटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला. अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक सुरु झाली. अखेर आमदार गोटे याना पोलिसांनी सुरक्षाकड्यात व्यासपीठावरुन सभेबाहेर नेले. या वादानंतर आमदार गोटे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours