23 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांचं ब्लडप्रेशर वाढलंय आणि त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीतील रोजीरोटीचा प्रश्नं निर्माण झाला आहे. त्यामुळेच अयोध्येत शिवसेनेला रोखण्याचं कारस्थान होत असल्याचा आरोप आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. अयोध्येला निघण्यापूर्वीच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरी शैलीत भाजपवर टिकेचे बाण सोडण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आज अयोध्येला रवाना होणार आहे. परंतु, अयोध्येत होणाऱ्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सेनेनं इतर ठिकाणी सभा घ्यावी लागणार आहे. आज शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'तून 'आम्ही अयोध्येकडे  निघत आहोत' या आशयाखाली अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. यात अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे.

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्याय. काहीही करून शिवसेनेला रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? असा थेट सवाल सेनेनं विचारला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours