पंढरपूर, 29 मार्च : लोकसभेचा ज्वर आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर य़ांनी काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराचा नारळ फोडताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून अनेक आरोप होत असताना त्यावर राहुल गांधींनी मौन बाळगल्याने त्यांच्याबाबत संशय बळावला आहे. यामुळेच आम्ही काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यात घराणेशाही सुरू असून केंद्रातील मोदी सरकार संस्कृती नसलेले आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध काम करणारे सरकार असल्याचं आंबेडकर म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours