मुंबई : देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरतं झोपवलं आहे, असं आत्ता हाती आलेले कल सांगतात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाही जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर नाही. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. तर युती 43 जागांवर आघाडीवर आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी सर्व जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल 43 जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48जागांचे कल असे आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours