नवी दिल्ली, 16 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 'काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, पण एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे,' असं आझाद यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असं याआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं. पण आता गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मोदींना दूर ठेवण्यासाठी हालचाली
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours