नवी दिल्ली: महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commision of India) महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Haryana) आणि झारखंड (Jharkhand)या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या तिन्ही राज्यात या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिला निवडणुका होतील. अर्थात अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 12 तारखेलाच ही घोषणा केली जाऊ शकते असे सूत्रांकडून कळते.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.
तिन्ही राज्यात भाजपची सत्ता
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप(Bharatitya Janta Party)ने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील 288 पैकी 122 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. झारखंडमध्ये 77 पैकी 35 जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली होती आणि रघुबर दास (Ragubhar Das) हे मुख्यमंत्री झाले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours