धारावी, 10 एप्रिल : धारावीत कोरूनाचे आणखी 5 नवे रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी समाजाचे आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत.
दरम्यान, हे दोघेही राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं आयसोलेटेड करण्यात आलेले होते. खरंतर राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानी मुंबईत आढळले आहेत. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीर मुंबई महानगरपालिकेनं धारावीसाठी स्पेशल प्लॅन आखला आहे.
धारावीतील ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.
धारावीतल्या 7 लाख 50 हजार लोकांचं 10 दिवसांमध्ये स्क्रिनिंग होणार
या प्लानबाबत मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन दीडशे डॉक्टर देणार आहे. त्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.
यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसी चे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची एक टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम्स तयार करून त्या 10 दिवसांमध्ये धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचं स्क्रिनिंग करणार आहेत.
धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयसोलेशनसाठी ठेवणार
यात लक्षणं आढळणाऱ्या लोकांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयसोलेशनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर ज्यांना ठळकपणे लक्षणे दिसून येतील त्यांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जाणार आहेत. ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोन च्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनेटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
कोरोनाचा प्रकोप देशात वाढतो आहे. दररोज रुग्णांच्यां संख्येत मोठी वाढ होत आहे. मृत्यूची संख्याही वाढतो आहे. कोरोना विरुद्धची लढाई ही दिर्घकाळ लढावी लागेल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिले आहेत. कोरोनाचा माणसांच्या दररोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. ही मोठी लढाई असल्याने त्याविरुद्ध लढण्यासाठी मोदी सरकारने एक ‘मास्ट प्लान’ तयार केला आहे. तीन टप्प्यात त्याची अमंलबजावणी होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours