अहमदनगर, 22 जुलै : नगर-सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चारच्या सुमाराला स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 9 वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील रहिवासी आहेत. प्रवासादरम्यनान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात 5 जणांचा जीव गेला आहे.
रविवारी सकाळी 4 वाजता नगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारामध्ये हा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर येथून नेवासाकडे जात होती. तर ट्रकही सोलापूरच्या दिशेने जात होता. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours