कोकणातले नवे रस्ते उखडलेलेच आहेत त्यामुळे कोकणातल्या कंत्राटदारांना तुम्ही आपल्या पद्धतीनं जाब विचारला पाहिजे असा आदेश आज राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. नाशिकमध्ये कंत्राटदारांना आमची भीती होती त्यामुळे खड्डे झाले नाहीत याची आठवण त्यांनी करून दिली. कोकणातील जमीन परप्रांतीय बळकावत आहेत 'त्यांना मनसे स्टाईलने उत्तर द्या' असे आदेश आज राज ठाकरेंनी दिलेत. कोकणासारख्या पवित्र भूमीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं दुर्लक्ष होत असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours