विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून त्यांनी राजीनामा दिला. तसेच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभार मानले.

श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
संग्रहित छायाचित्र
प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला असतानाच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात झाली होती. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर महामंडळ आणि आयोजक संस्था या नामुष्कीचे खापर परस्परांच्या डोक्यावर फोडत आहेत.
निमंत्रण रद्द करण्याआधी श्रीपाद जोशी यांनी साहित्यिकांशी चर्चा केली पाहिजे हवी होती, अशा शब्दात काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जोशींच्या या विचित्र निर्णयामुळे महामंडळाचे इतर सदस्य निष्कारण टीकेचे धनी ठरत आहेत, असेही काही साहित्यिकांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून त्यांनी राजीनामा दिला. तसेच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभार मानले. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours