ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात टाळण्यासाठी शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळया-पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळया-पिवळया जीपमधून सर्व सामान्य प्रवासी शेअरींगद्वारे शहरांतर्गत आणि ग्रामीण भागात ये-जा करत असतात, त्या अनुषंगाने प्रवासादरम्यान कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रसार आणि प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतुक करणारी वाहने जसे 'शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेशाची अंमजबजावणी आजपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours