रिपोर्टर-हर्षीता ठवकर

दर्यापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीची एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. प्रमोद कुटे  यांच्यासारख्या हाडामासाच्या प्रामाणिक शेतकऱ्यांना यांचे परिणाम भोगावे लागत आहे. कुटंसारख्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा काय , असा प्रश्न भाजपचे नेते माजी खासदार नाना पाटोले यांनी दर्यापूर येथे मांडला.
    दर्यापूर शहरातील सैनागर येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांनी पत्नीचे दागिने विकून व उपासमार करून कर्ज भरले होते.  पण,या शेतकरी कुटेना  जुजबी मदत शासनाने देऊ केली आहे. त्याविरोधात त्यांनी आत्मदहणाचा इशारा दिला आहे. हि बाबा कानावर पडल्या नंतर काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी शनिवारी यांची भेट घेतली .मागील सरकारने केलेल्या सरसकट कर्जमाफीची आठवण देत पाटोले म्हणाले , शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांना समजत नसतील , तर ही बाब दुर्दैवी आहे . सरसकट कर्जमाफी दिली असती , तर , प्रमोद कुटे यांच्यासारख्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर जावेच लागले नसते मुक्यामंत्र्यांनी आजपर्यंतही दानावरच भागावले असून , त्यांना कुटेंनी दिलेली शेतीसुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे कुटेंनी आपल्या कुटुंबाला आधार देत आत्मदहणाचा निर्णय मागे घेऊन आदर्श शेतकरी म्हणून जगावे , असा सल्ला त्यांनी दिला तसेच प्रमोद कुटे , कल्पना कुटे व मुलगी पल्लवी कुटे यांना धीर दिला.

विडियो देखे- 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours