रिपोर्टर सय्यद जाफरी
मौजा पांढराबोडी,सिरसी,केसलवडा व शुक्रवारी भंडारा तालुक्यातील असून आम्ही वारंवार शासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती करून धरणे आंदोलन केल्यानंतरही आमच्या शेतीच्या अग्रीमेंट असून आमचा भंडारा तालुका हा शेवटचा भाग असल्याने शासनाच्या नियमानुसार सर्वात अगोदर पेंच प्रकल्प रामटेक धरणाचे पाणी आमच्या शेतीला पाहिजे होते परंतू शासनाने आमच्याकडे लक्षच दिले नाही त्यामुळे आमच्या शेतीला पाणी मिळाले नाही त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे करिता शासकीय यंत्रणेच्या मध्मातून आमच्या धानाचे सर्व्हे (निरीक्षण) करून भंडारा तालुका दुष्काळ घोषित करावा अश्या प्रकारचा निवेदन पालकमंत्री श्री चंद्रशेकरजी बवनकुळे भंडारा यांना धनराज साठवणे माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते यांच्या नेतृत्वात देण्यात आला अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला त्यावेळी सर्वश्री कमल साठवणे,जीवन भजनकर,संजय वाघमारे,पृथ्वी तांडेकर,गणेश लिमजे,हिरामण लांजेवार, दिलीप मेश्राम,हेमचंद भुरे,अशोक निमकर,मिलिंद जोशी,विनायक दिवटे, संदीप केसलकर,प्रशांत भुरे,योगेश साखरकर, लीलाधर साठवणे,मोहन बंगडकर,आकाश मेश्राम,रजत रंगडले,  ,इत्यादी कार्यकर्ते हजर होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours