मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय स्फोट घडविणारी मुलाखत दिली आहे. शंभर जाहीर सभांची ताकद असणारी ही मुलाखत म्हणजे 'सौ सोनार की आणि एक लोहार की' ठरल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या मनातील सर्वच प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तरे दिली.
'शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती. देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय?' असा कडक सवाल त्यांनी टीकाकारांना केला.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours