नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : अयोध्या जमीन विवादप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. कारण न्यायालयानं स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीच्या माध्यमातून या वादावर तोडगा निघला नाही. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ समिती अपयशी ठरली. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठानं 6 ऑगस्टपासून अयोध्या जमीन वादावर नियमित सुनावणी घेऊ, असे 2 ऑगस्टला न्यायालयासमोर म्हटलं होतं.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानं काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours