नाशिक, 22 डिसेंबर : राज ठाकरे यांनी नाशिक जिल्हाचा दौरा संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का, याबाबत खुलासा केला आहे. 'मी आघाडीत जाणार या तुमच्या बातम्या आहेत. शरद पवार मला विमानात भेटले म्हणजे काय आम्ही सोबत का ? याबाबत निवडणुका आल्यानंतर भूमिका जाहीर करेन,' असं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत विरोधी पक्ष जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. पाच राज्यांत भाजपचा झालेला पराभव हा लोकांचा मोदींवरील राग आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- पंडित नेहरूंची लोकप्रियता निर्विवाद होती
- मोदींपेक्षा हा देश सगळ्यात जास्त कोणीच खड्डयात घालू शकत नाही
Post A Comment:
0 comments so far,add yours