कोची :  देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यात सापडला. कोरोना रुग्णांच्या संख्येत केरळ बरेच दिवस देशात नंबर वन होतं. मात्र, केरळने हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवली. आत्ताच्या घडीला केरळमध्ये 732 कोरोनाबाधित आहेत. त्यातले 512 बरे झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला. आत्ता केरळमध्ये फक्त 220 रुग्ण आहेत. केरळचा रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे 69.94 टक्के इतकं आहे. केरळमधील कोरोनाप्रसार रोखण्यात एक मराठमोळं नाव सुद्धा आहे.

विजय साखरे हे मूळचे नागपूरचे असून आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. ते सध्या पोलीस महानिरिक्षक (IGP) आणि कोचिनचे पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सुरुवातीला रेड झोन असलेल्या कासरगोड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी विजय साखरे यांच्यावर होती. त्यांनी कासरगोड कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours